बीड : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदचे ऐलान केले आहे. हा बंद यशश्वी करण्यासाठी बीडमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे अवाहन करण्यात येत असून प्रतिष्ठाने उघडलेल्या व्यापाऱ्यांना गुलाबाचे फुल भेट देऊन दुकान बंद करण्याचे अवाहन शिवसेनेतर्फे केले जात आहे.
बीडमध्ये बंद यशश्वी करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. सकाळी ६ वाजता शहरातील बाजारपेठेत सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते गस्त घालताना दिसून येत आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे. बंद शांततेत पार पडावा यासाठी सहकार्य करण्याचे अवाहनही करण्यात येत आहे. दरम्यान बीड शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक चौकात पोलीस कर्मचारी गस्त घालताना दिसून येत आहेत. बंद दरम्यान अद्यापपर्यंत बीड शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद शांततेत पार पडत आहे.
यावेळी शिवसेना नेते परमेश्वर सातपुते, उप जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान जगताप, बप्पासाहेब घुगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड शहरात अत्यावश्यक सेवेला या बंद तून वगळण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार आता जास्त दिवस बाहेर राहणार नाहीत; निलेश राणेंचा दावा
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
