Share

औरंगाबादच्या केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्राचा मार्ग मोकळा, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : केंद्र सरकार पुरस्कृत केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र (CGHS) सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. हे केंद्र औरंगाबाद येथे व्हावे, यासाठी आपण वारंवार केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. त्याला यश आले असून, निती आयोगाच्या माध्यमातून आवश्यक बाबींची पुर्तता करावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

खैरे यांनी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात ४ ठिकाणी हे केंद्र आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथे लोकांना उपचारासाठी जावे लागते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय कर्मचारी, माजी सैनिक, स्वतंत्रसैनिक, संरक्षण विभागाचे कर्मचारी, निवृत्त वेतनधारक आदी आहेत. त्यामुळे हे केंद्र औरंगाबाद येथे होणे आवश्यक आहे.

या केंद्राचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो केंद्रीय कर्मचारी व वयोवृध्द नागरिकांना उपचारासाठी २०० ते ४०० किलोमीटर जावे लागणार नाही. या केंद्रामुळे दैनंदिन उपचाराबरोबर कोरोना तपासणी, उपचार, आणि निदान करणे सोपे जाईल. तसेच केंद्रीय कर्मचारी यांची होणारी धावपळ होणार नाही. या सर्व बाबींचा गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी चंद्रकांत खैरे यांनी अमिताभ कांत यांच्याकडे केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!