Share

संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी शिवसैनिकांची यवतमाळ ते मुंबई सायकल वारी

Published On: 

मुंबई – शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्यावे या मागणीसाठी शिवसैनिक गिरीश व्यास हे यवतमाळ ते मुंबई सायकल वारी करणार आहेत. हा प्रवास 700 किमीचा आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्याचं साकडं घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

यवतमाळ येथून ते मुंबई दादर येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत जाण्यासाठी निघाले आहे. पुढील 8 दिवसात ते मुंबईला पोहचतील.दरम्यान,  पूजा चव्हाण या तरुणीने सात फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते.

विरोधकांनी रान पेटवल्यानंतर राठोड काही काळ नॉट रिचेबल झाले होते.पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप आणि काही फोटोंमुळे हे प्रकरण राज्यभर गाजलं. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर या प्रकरणामुळे राठोडांना मंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!