Share

शिवजंयती जल्लेषात साजरी करणार; नानासाहेब जावळे यांचा यल्गार

Published On: 

🕒 1 min read

लातूर : एकीकडे शासनासह सर्वच राजकीय पक्षांचे कार्यक्रम सभा-संमेलन घेत आहेत. त्या सभांना गर्दी होते. मात्र शिवजयंतीला होणारी गर्दी शासनाने कोरोना संसर्गाचे कारण दाखवत नियमावली जाहीर केली आहे. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करणार आहोत. त्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही असा निर्धार छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी शुक्रवारी लातूर येथे केला आहे.

शासनाने शिवजंयती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. पण एकीकडे शासन आणि राजकीय पक्ष मेळावे, सभा घेत आहेत. यात कोणतेच निर्बंध पाळले जात नाही. तसेही कोरोना संसर्ग आता ओसरला आहे. तेव्हा शिवजयंतीसाठी कोरोनाचे कारण देऊन नियमावली जाहीर करणे अंत्यत चुकीचे आहे. याला आमचा विरोध आहे, असे म्हणुन शिवप्रेमी नागरिक, कार्यकर्ते १९ फेब्रुवारी रोजी शिवजंयती थाटमाटात आणि जल्लोषात साजरी करु असे नानासाहेब जावळे-पाटील यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवरायांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्रात शिवजंयती साजरी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, हे दुर्दैव आहे. शिवरायांचे सरकार हे सर्वाना सोबत घेऊन चालणारे होते. शिवरायांचे विचार आजही शिवप्रेमींच्या मनामध्ये रुजलेले आहेत. असेही नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, मराठा सेवा संघ आणि मराठा महासंघाचे पदाधिकाऱ्यासंह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!