सांगली : शरद पवार हेच आपले राज्य चालवतात, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना बोलून काही उपयोग नाही, अशी खोचक टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी अशा खोचक शब्दात टीका केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पण याबाबत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी बोलावे, असा सल्ला राज्यपालांनी दिला आहे.
यावरून शरद पवार हेच राज्य चालवतात, हे स्पष्ट होते. शरद पवार घराबाहेर पडतात, उद्धव ठाकरे यांनी बोलून काही उपयोग नाही, असा सणसणीत टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं केलेलं कौतुक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : तातडीने घटनापीठ स्थापन करा! सरकारची मुख्य न्यायमुर्तींना दुसऱ्यांदा विनंती
- नगरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजा व खसखसची शेती करू द्या!
- १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे उघडा अन्यथा टाळे तोडू; भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा
- मुंबई : ९०० कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप;चौकशी करण्याची मागणी
- निष्टावंतांना डावलून कॉंग्रेसकडून ‘हे’ नाव निश्चित ; वाचा काय आहे प्रकरण


