🕒 1 min read
कोल्हापूर : गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
TV9 मराठीने एका स्थानिक चॅनेलच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.
दरम्यान, खा.शरद पवार हे आज कोल्हापूरमध्ये असून त्यांनी येथे सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील जी इच्छा व्यक्त केली त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी, “त्यात काय झालं? त्यांना शुभेच्छा. उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावेसे वाटेल, कोणी तसे करणार का?” असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारला.
महत्वाच्या बातम्या
- प्रक्रिया केंद्र २४ तास चालवून कचरा शून्यावर आणा : आयुक्त
- महाराष्ट्राच्या इतिहासात विनायक मेटेंसारखा महाखोटारडा नेता झाला नसेल : कॉंग्रेस
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- भालचंद्र मुणगेकर यांच्या घरावर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद काढणार निषेध मोर्चा
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
