औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपो बंद झाल्यापासून म्हणजेच २०१८ पासून महापालिका चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर शहरातील कचरा नेऊन टाकत आहे. आजघडीला येथे कचर्याचा मोठा डोंगर तयार झाला आहे. हा कचर्याचा डोंगर आगामी १५ दिवसात कोणत्याही परिस्थितीत साफ करा, कचरा प्रक्रिया प्रकल्प चोवीस तास चालवा पण कचऱ्याचे ढीग संपवा, अशी स्पष्ट ताकीद पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी गुरूवारी (दि. २१) कंत्राटदार मायोवेसल्स कंपनीला दिली.
महापालिकेने राज्य शासनाच्या निधीतून चिकलठाणा आणि पडेगाव येथे सुमारे दीडशे टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले आहेत. तसेच कांचनवाडी येथे ३० टन ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप चिकलठाणा आणि पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर अद्याप शेकडो टन कचरा पडून आहे.
दरम्यान, गुरुवारी प्रशासकांनी चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी प्रकल्पावर पडून असलेला कचऱ्याचा ढिग पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. पडेगाव व चिकलठाणा हे दोन्ही प्रकल्प २४ तास चालवा पण तेथील कचऱ्याचे ढिग शून्य करा, बंद पडलेल्या कचरा सॉर्टिंग यंत्र लवकरात लवकर सुरु करण्याची सूचना त्यांनी घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना दिली. नारेगाव, चिकलठाणा येथील कचऱ्याच्या ढिगारामुळे यंदा स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शहराची रँकिंग कमी होते की काय? याचीच चिंता प्रशासनास लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो : मोहम्मद सिराज
- महाराष्ट्राच्या इतिहासात विनायक मेटेंसारखा महाखोटारडा नेता झाला नसेल : कॉंग्रेस
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- भालचंद्र मुणगेकर यांच्या घरावर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद काढणार निषेध मोर्चा
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

