नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत टीका केली. मागील १०-१२ दिवस राज्यात दोनजण सरकार चालवत आहेत आणि मंत्रिमंडळाची निर्मिती अद्याप झालेली नाही. इतके दिवस लागणे हे योग्य नसल्याचे शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटले आहे.
राज्यात अतिवृष्टी आणि अन्य प्रश्न लोकांपुढे असताना त्याबाबत निर्णय घेऊन कामाची जबाबदारी घेणारी जी मंत्रिमंडळाची यंत्रणा आहे तीच राज्यात नाही. त्याला विलंब लागत असेल तर हे राज्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत नुकसानकारक आहे. नवीन सरकार आल्यानंतर नवीन काही केले असते तर त्यांचे मी अभिनंदन केले असते. परंतु पूर्वीच्या सरकारने घेतलेले एक-एक निर्णय रद्द करणे, यावरच आपण फार मोठं काम करतोय असे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, जो राज्याच्या दृष्टीने चांगला नाही. असा टोला शरद पवारांनी लगावला.
दरम्यान यावेळी शरद पवारांनी केंद्रावरही निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. केंद्र सरकारची जबाबदारी आहे की देशाची अर्थव्यवस्था नीट कशी राहील हे पाहणे. त्या दृष्टीने योग्य पावले टाकली नाहीत ही विरोधकांची तक्रार होती. रुपयाची होणारी घसरण पाहता विरोधकांची तक्रार योग्य होती. हा विषय संसदेमध्ये आम्ही आग्रहाने मांडणार असल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू म्हणतोय,“युझवेंद्र चहल टी-२० विश्वचषकात भारतासाठी…”
- Devendra Fadnavis : “ज्यांनी फुटकी कवडी दिली नाही, त्यांना पेट्रोल-डिझेलवर बोलण्याचा…”, फडणवीसांनी विरोधकांना सुनावले
- Clyde Crasto : “फडणवीसांनी लक्षात ठेवावे, राज ठाकरेंनी शिवसेना सोडली पण…”, राष्ट्रवादीचा टोला
- खराब कामगिरीच्या दबावामुळे ‘या’ भारतीय दिग्गज खेळाडूंनी केली होती अचानक निवृत्तीची घोषणा; वाचा!
- Congress : “मोदींना टेलिप्रॉम्प्टर लागतो आणि शिंदेंना फडणवीस”, कॉंग्रेसचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

