Share

‘न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार’

Published On: 

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागामार्फत गट क आणि ड संवर्गातील विविध पदांकरीता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षात मोठा गोंधळ झाला. याबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली असून राज्य सरकारला तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. भातखळकर ट्विटमध्ये म्हणाले, प्रत्येक बाबतीत न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार… अशी टीका भातखळकरांनी राज्य सरकारवर केली आहे.

न्यासा कंपनीमार्फत गट क पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रश्नपत्रिका चुकीच्या दिल्या तसेच गट ड च्या प्रश्नपत्रिका या गट क साठी वितरीत केल्याने त्या परीक्षेपूर्वीच फुटल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला होता.

त्यामुळे या विरोधात एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर व इतर उमेदवारांनी अॅड. विशाल कदम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी न्यायधिश एस.व्ही. गंगापूरवाला व आर एन लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात त्यांनी राज्य सरकारला नोटीस काढली असून तीन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!