मुंबई: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोरोना काळातील महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. कोरोना काळात आरोग्य सेवकांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्यांच्या नशिबी फरपट आणल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारवर नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी दवाखान्यांना लागणाऱ्या आगी, ऑक्सिजन अभावी तफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळतीमुळं आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात फ्रटलाईन वर्कर्स, कोविड वॉरिअर्स यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची सेवा केली त्यांच्या नशिबी आघाडी सरकारनं फरपट आणून ठेवल्याचं नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/LovI6USL4H
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 30, 2021
फ्रंटलाईन वर्कर्सनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं हे शिवसेनेचे स्वार्थी धोरण अत्यंत निंदनीय असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. महापालिकेतील वस्तुस्थिती तुमच्यापासून लपवली गेली असेल याची मला खात्री आहे म्हणूनच हे वास्तव तुमच्यापुढे मांडत आहे, असं नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. निदान फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनाही ठाकरे सरकार त्यांच्यासोबत संधीसाधूपणाच राजकारण करत नाही ना, अस वाटू नये, असा खोचक टोला नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मंत्री कोरोना नियम पायदळी तुडवताय, सर्वसामान्यांना मात्र आर्थिक दंडाची शिक्षा’
- निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना माफी मागणार? प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया
- शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार- शंभूराजे देसाई
- तुम्ही माफी मागा, आम्ही कारवाई मागे घेतो- केंद्र सरकार
- ‘मंत्री आहात ना, मग जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना…’, सदाभाऊंचा बच्चू कडूंना सल्ला


