कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर आहेत. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधी आपली भूमिका मांडत आहेत. यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमतानं हाताळण्यापेक्षा दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता. असा थेट आरोप शाहू महाराज यांनी केला आहे. तर नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भेट घेतली या भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. अशी माहिती शाहू महाराज यांनी याप्रसंगी बोलताना दिली आहे.
मराठा समाजाचा हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला आहे, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे, आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय काही होणार नाही. असं देखील शाहू महाराज म्हणाले आहेत. दरम्यान, मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे. केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं असे आवाहन देखील शाहू महाराज यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारचा निर्णय दारू विक्रेत्यांसाठी’, चंद्रपूर दारूबंदी उठवण्याचा ५०० गावांकडून निषेध
- ‘मला माहित आहे की तु माझ्यासोबत आहे…’; अंकिताची भावूक पोस्ट
- जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना आश्वासनाखेरीज सरकारने काहीही दिले नाही
- वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू – हसन मुश्रीफ
- ‘अहंकार जोपासण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट व जनतेचे हाल हेच वसुली सरकार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
