मुंबई : शिवसेनचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने म्हणजे ईडीने जप्त केली. यानंतर राज्यात आरोप – प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राउतांवर जोरदार टीका केली आहे. “संजय राउतांना लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याशेजारी शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवले पाहिजे” असे नितेश राणे म्हणाले.
इडीने संपत्ती जप्त केला याचाच अर्थ इथे भ्रष्टाचार झाला आहे. आणि हा भ्रष्टाचार संजय राऊत या माणसाने केला आहे. म्हणूनच संजय राउतांना लवकरच घोड्यावरून तुरुंगात पाठवले पाहिजे.अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या शेजारी शिवभोजन थाळी खाण्यासाठी संजय राउतांना पाठवले पाहिजे. असे नितेश राणे म्हणाले.
दरम्यान संजय राऊत यांची संपत्ती इडीने जप्त केली आहे. यात राऊत यांचे मुंबईतील राहत्या घराचाही समावेश आहे. यावरून आता भाजपच्या विविधनेत्यांकडून क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022 RCB vs RR: युझवेंद्र चहलसाठी आजचा सामना आहे स्पेशल! तब्ब्ल आठ वर्षांनी घडणार ‘अशी’ गोष्ट
मुस्लिमांची प्रतिमा डागाळण्याची भीती, ‘या’ चित्रपटावर घालण्यात आली बंदी
IPL 2022 RCB vs RR: मॅक्सवेल संबधी मोठी अपडेट! आज राजस्थान विरुद्ध मैदानावर उतरणार?
अजित पवारांना ‘मुतऱ्या तोंडाचे’ म्हणत शिवसेनेनं केली होती जहरी टीका! आता मात्र बदललीय भूमिका
“श्रीलंकेसारखी परिस्थिती भारतात ही होऊ शकते..” केआरकेचा मोदी सरकारवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

