Share

पहिला त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी खुद सेहवागनेच केली होती

Published On: 

मुंबई : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग हा त्याच्या फलंदाजीसाठी जगविख्यात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय आहे. मात्र पहिला त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी खुद्द विरेंद्र सेहवागनेच केली होती. आणि तीही ३ वर्षे आधिच काय आहे किस्सा पहा.

भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मणने आपल्या २८१ अँड बियॉन्ड या आत्मचरित्रात याबद्दलची आठवण मांडली आहे. २००१ मधील ऐतीहासीक कसोटी सामन्यात व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने तब्बल ४५२ चेंडु खेळत २८१ धावांची खेळी साकारली होती. त्या सामन्यात लक्ष्मणचे त्रिशतक थोडक्यात हुकले होते. त्या सामन्या राहुल द्रविड बरोबर 376 धावांची भागिदारी रचत भारताने तो सामना फॉलोऑन मिळाल्यानंतरही जिंकला होता. या सामन्यात लक्ष्मणला ग्लेन मॅकग्राथने बाद केले होते.

या सामन्यानंतर काही दिवसांनी पुण्यात सेहवागने लक्ष्मणला म्हटले की, लक्ष्मण भाई, तू कोलकता कसोटीत त्रिशतक करण्याची चांगली संधी गमावली. आता मी कसोटी क्रिकिटमध्ये त्रिशतक करणारा भारताचा पहिला फलंदाज बनेल. तू बघच.” त्यावेळी लक्ष्मणने सेहवागकडे आश्चर्याने पाहिले. कारण त्यावेळी सेहवाग फक्त चार एकदिवसीय सामने खेळला होता. कसोटीत तर तो संघातही नव्हता तरीही तो अशी भविष्यवाणी करत होता. या घटनेनंतर सेहवागने तीन वर्षांनंतर पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे २९ मार्च २००४ रोजी त्रिशतक करत ती भविष्यावाणी खरी केली आणि सेहवागने लक्ष्मणला भविष्यवाणी खरी झाल्याची आठवणही करुन दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!