औरंगाबाद : नव्या शैक्षणिक वर्षाला मंगळवार, १५ पासून सुरुवात झाली. मात्र ग्रामीण भागात अध्यापनाविषयी शासनआदेश आला नसल्याने फक्त शाळा उघडून स्वच्छता करण्यात आली. अंदाजे सोमवारपासून अध्यापनाला सुरुवात होईल असा अंदाज जिल्हा परिषद शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
दरवर्षीप्रमाणे नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ उत्साहात होत असतो. मुलांचा किलबिलाट, शिक्षकांची घाई गडबड, पुस्तकांचे वाटप, विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने स्वागत, अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस साजरा होतो. मात्र यंदा मागील वर्षीप्रमाणेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्ष शाळांना परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे यंदाही शाळांत त्या प्रमाणात उत्साह दिसून आला नाही.
शासनाच्या आदेशानुसार, मंगळवार १५ पासून शाळांना सुरु करण्याचे आदेश होते. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत नियोजन होते. त्यानुसार, शहरी भागात १०० टक्के तर ग्रामीण भागात ५० टक्के शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार, शहरी व ग्रामीण भागात शिक्षकांनी उपस्थिती लावली. शहरात ऑनलाईन वर्गही सुरु झाले मात्र ग्रामीण भागात शासनाचे आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे ऑनलाईन वर्ग सुरु झाले नसल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी सांगितले. मात्र शासनाने सांगितल्यानुसार, ग्रामीण भागातील सर्व शाळेत ५० टक्के शिक्षक उपस्थित होते. मंगळवारी ग्रामीण भागातील शाळांनी शाळेची स्वच्छता, साफसफाई, निर्जंतुकीकरण, सुशोभीकरण केले असल्याचे ते पुढे म्हणाले.
लवकरच अध्यापनाबाबत शासननिर्णय प्राप्त होईल. त्यानुसार अध्यापन सुरु होईल. अध्यापन ऑनलाईन करायचे कि ऑफलाईन हे तेव्हाच समजेल. अंदाजे सोमवार २१ जूनपासून अध्यापनाला सुरुवात होईल अशी आशा जैस्वाल यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?
- ‘ते राणीच्या बागेत आंदोलन करत नव्हते, शिवसेना भवनाची गरिमा आहे’; शिवसेना नेता संतापला
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा


