🕒 1 min read
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्र्यांच्या कारभारावर आरोप करत भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्याच बरोबर किरीट सोमय्यांनी आता 31 डिसेंबरला 40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे.
आमचं महाराष्ट्राला कमिटमेंट आहे की, 31 डिसेंबर पर्यंत 40 चोरांचे घोटाळे काढून 1 जानेवारीला महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करणार आहे. दिवाळी आज आहे पण पाडवा मात्र 1 जानेवारीला असेल, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे. दिवाळीच्या दिवशी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केलं. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 105 कोटी जनतेचं लसीकरण केल्यामुळे मोदींवर स्तुतीसुमनेही उधळली आहेत.
यापूर्वी किरीट सोमय्यांनी राज्यातील अनेक नेत्यांवर आरोप केले त्यांच्यावर ईडी, आयकर विभागाचे छापेमारीही झाली. भावना गवळी, अनिल देशमुख, हसन मुश्रिफ, अजित पवार, बजरंग खरमाटे, अशा अनेक नेत्यांवर आरोप केले. आता आणखी 40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा दावा केला आहे. त्यामुळे सोमय्यांच्या रडारवर असणारे हे 40 नेते नेमके कोण हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन??’
- भाजप नेत्याची दादागिरी; काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळू दिला नाही म्हणून हवालदाराच्या लगावली कानशिलात
- द्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- ‘राज्य सरकारनेही इंधनावरील कर थोडे कमी करून हातभार लावायला काय हरकत आहे?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
