🕒 1 min read
मुंबई: शेतकऱ्यांच्या वीजतोडणीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत त्यांना सल्ला दिला आहे.
“राऊत तुम्ही वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत लेख लिहिता. पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात बिनधास्त फिरवून दाखवा, म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल. उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. संजय राऊत यांनी यावर कधीतरी एखादा लेख लिहावा”, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मोदी -शहांच्या राज्यात हे असे का घडावे? लोकांना भयमुक्त, शांतपणे का जगता येऊ नये? सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर का यावी?”, यावरून सध्या भाजपकडून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “काँग्रेस-राष्ट्रवादी उपटले तसाच एमआयएम…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- गोव्यात उशिरा सत्ता स्थापनेमागचं कारण काय? पहा..
- VIDEO: …आणि फलंदाजाने फिल्डिंग टीमची उडवली खिल्ली, असे दृश्य तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल!
- IPL 2022 : तब्बल ८ वर्षानंतर लीगमध्ये घडणार ‘अशी’ गोष्ट; लखनऊ संघाला मिळाला मान!
- “… सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”, रोहित पवारांची Zomato कडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
