🕒 1 min read
मुंबई : अग्निपथ योजनेबाबत गेल्या चार दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनाच्या नावाखाली जाळपोळ, तोडफोड केली जात आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे आवाहन देशभरातील तरुण करत आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तिन्ही सैन्यात भरतीसाठी केंद्र सरकारच्या नव्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक शहरांमध्ये विरोध सुरू आहे. या मुद्द्यावरून सातत्याने होत असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे सरकारची चिंता वाढली आहे. परिस्थिती पाहता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संरक्षण मंत्रालयात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत तिन्ही सेवांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. बैठकीत परिस्थिती शांत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
