मुंबई : देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Sushil Chandra) यांनी केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच यावेळी कुणालातरी निवडणुका उरकण्याची घाई असल्याचे म्हणत राऊतांनी भाजपवर अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे.
यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’आपण महाराष्ट्रात जे आकडे पाहतोय ते भयानक आहेत. परंतु उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची नोंद होत नाही. त्यामुळे पुढील दोन तीन महिन्यात जे चित्र दिसेल ते भयावह असेल.’ तसेच निवडणूक आयोगाने त्यांचे काम काम केले असून निर्बंध घातले आहेत. परंतु,कुणाला तरी निवडणुका संपवायच्या आहेत,असा अप्रत्यक्ष टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पंजाब, उत्तर प्रदेश, मनीपूर आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती चांगली नाही. निवडणुक आयोगाने निर्बंध घातले आहेत. हे कागदावरती ठिक आहेत. देशाचे पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना कुठलेही नियम नसतात आणि तेच इतरांसाठी असतात. त्यामुळे निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा.’
महत्वाच्या बातम्या:
- ‘त्या बातम्या खोट्या असून शिवसेनेत फक्त…’, आदित्य ठाकरेंनी दिला ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- ‘विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी…’, राऊतांचा हल्लाबोल
- “…त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल”
- ‘…या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्णसंख्या आढळू शकते’, आयआयटी प्राध्यापकाचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

