Share

‘त्या बातम्या खोट्या असून शिवसेनेत फक्त…’, आदित्य ठाकरेंनी दिला ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेना आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नगरसेवक किंवा नेत्यांना तिकीट देणार नसल्याच्या बातम्या बघायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं’, असे आदित्य ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. याला अनुसरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगायलाही सुरुवात झाली आहे. असे असतांनाच मुख्यमंत्री ठाकरेंनी जिल्हा विकास योजनेतील निधीतून केलेली कामे मार्गी लावा, त्यांचा अहवाल तयार करा आणि शहरात शिवसेनेने केलेली कामे आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश विभागप्रमुखांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!