मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव असता ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध करून अर्णबच्या जामीनावर तातडीने सुनावणी करण्यात आली.
अर्णबला करण्यात आलेली अटक ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून गेल्या काही महिन्यात सुशांत सिंह राजपूत, पालघर येथील साधू प्रकरण, कंगना रानौत प्रकरण आदी प्रकरणावरून सातत्याने महाराष्ट्र सरकार व महाविकास आघाडीतील पक्षांवर टीकास्त्र सोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.
तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईमध्ये काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले आहेत.
यावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र” असा आक्रमक इशारा देखील संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिला आहे.
अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर.एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून!
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) November 12, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘ट्विटर’ची टिव टिव बंद होण्याची शक्यता!
- त्या पिडीत महिलेला दहा लाखांची मदत; राज्यमंत्री बच्चू कडू यांची घोषणा!
- उद्धवा अजब तुझे सरकार; ‘या’ राज्यमंत्र्याने थकवले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपये!
- शेतकरी विरोधी धोरणे रद्द करावीत; बलिप्रतिपदा दिनी हजारो शेतकरी पंतप्रधानांना पत्र पाठविणार!
- ग्रामीण भागातील रस्त्यांची वाळू वाहतुकीमुळे दुरवस्था; पोपट पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

