Share

Sanjay Raut ED Inquiry | संजय राऊतांच्या अटकेवर एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले…

Published On: 

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) पथक आज पहाटे मुंबईतील शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना दोनवेळा बोलावूनही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे आज सकाळी ईडीचे पथक त्याच्या घरी पोहोचले. याप्रकरणी पथक तीन ठिकाणी तपास करत आहेत. या तीन ठिकाणांपैकी एक राऊत यांचे निवासस्थान आहे. ईडीची कारवाई सुरू आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

कर नाही त्याला डर कशाला – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, “संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी होऊ द्या. त्यांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही. ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या. त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. ते महाविकासआघाडीचे मोठे नेते होते. तसेच जे ईडीला घाबरत असलेल्यांनी आमच्या पक्षात येऊ नये.”

संजय राऊत यांना रामदास कदमांचा टोला-

रामदास कदम म्हणाले, “संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवारांचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर शरद पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते.”

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (शिंदे गट) वक्तव्य आले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “गुवाहाटीहून आमचा मृतदेह आणण्याबाबत बोलणारी व्यक्ती आज अस्वस्थ आहे. भगवान के घर देर है अंधेर नहीं, जैसी करनी वैसी भरनी.”

तपासात सहकार्य न केल्याचा आरोप-

महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रकमेच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची चौकशी करत आहे. 1 जुलै रोजी संजय राऊत ईडीसमोर हजर झाले. ईडीने त्यांना 20 जुलै आणि 27 जुलै रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, राऊत ईडी कार्यालयात पोहोचले नाहीत. त्यामुळे त्याच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडीचे पथक राऊत यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी करू शकते, असे मानले जात आहे.

काय आहे पत्रा चाळ घोटाळा?-

हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका बांधकाम कंपनीला या भूखंडावर 3000 फ्लॅट बांधण्याचे काम मिळाले. त्यापैकी 672 सदनिका पूर्वीपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात येणार होत्या. उर्वरित रक्कम म्हाडा आणि त्या कंपनीला द्यायची होती, परंतु 2011 मध्ये या मोठ्या भूखंडाचा काही भाग अन्य बिल्डरांना विकण्यात आला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!