मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काल (१ मे )सभा घेत १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा दिला. भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता. तसेच तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे असा सवालही फडणवीस यांनी केला होता. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचायला हवं. त्यांनी रावणाचाही इतिहास वाचला पाहिजे. रावणाचा अंत अहंकाराने झाला. रावण त्याच्या अहंकारामुळे धारातीर्थी पडला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो तर काहींना सत्ता गेल्यानंतरही अहंकार येतो. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय अगोदर त्याचा अंत करावा आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
“बाबरी ढाचा पाडला, तेव्हा मी तेथे होतो. भाजपचे नेते अयोध्येत होते. त्यामुळे बदायूच्या तुरुंगात १८ दिवसांचा तुरुंगवासही भोगला होता. ढाचा पाडल्यानंतर ज्या ३२ जणांवर खटले चालले, त्यात शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकही नेता नव्हता. त्यामुळे तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे, याचा एकदा निकाल लावा.”, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.
महत्वाच्या बातम्या:
- “काहीच काम नसल्याने…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ अल्टीमेटमवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- “सरकार पाडण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करून दंगल…”; एमआयएमच्या नेत्याकडून घणाघात
- “लोकांनी हा भामटेपणा…” ; बच्चू कडूंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
- “देव कणाकणात आहे त्याची चर्चा…”, जितेंद्र आव्हाड यांचा विरोधकांना टोला
- “…काळातील CBI अहवाल तपासा”, बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती विचारणाऱ्या फडणवीसांना राऊतांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

