Share

‘आजपर्यंतच्या इतिहासात असा दिवस कधीच पाहायला मिळाला नव्हता’

Published On: 

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनामध्ये झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या पहिल्याच दिवशी 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यावरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले जात आहेत. दिल्लीत भाजपविरोधात विरोधक एकवटल्याचे पाहायला मिळत आहेत.

निलंबनाविरोधात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन केले जात आहे. आज राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी संसदेबाहेर जमत मोदी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

2 आठवड्यांपासून हा संघर्ष सुरू आहे. हे फक्त 12 खासदारांचे निलंबन नाही. मी मानतो की शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आमच्या खासदारांचे हे सर्वात मोठे बलिदान आहे. सरकार ऐकायला तयार नाही. आज जेव्हा आम्ही सकाळपासून सदनात आंदोलन सुरू केले, तेव्हा आमची मागणी होती लोकशाही वाचवा आणि आम्हाला न्याय हवा. पण लोकशाही आणि न्याय हे शब्द सरकारला ऐकायचे नाहीत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

आम्ही चेअरमन साहेबांकडे मागणी केली की आम्हालाही निलंबित करा. तर त्यांनी सरकारकडे बघून सांगितलं की त्यांना सांगा तुम्हाला निलंबित करायला. याचा अर्थ अध्यक्षांचे अधिकार सरकारकडे आहेत. सरकारला वाटलं तर निलंबित करतील, सरकारला वाटलं तर निलंबन मागे घेतील. आजपर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नव्हता, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!