मुंबई : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘या सर्व गोष्टींचा सर्वात मोठा झटका भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला आहे. खरंतर त्यांना हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करायच्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही’, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले असून इथे फक्त कायद्याचे राज्य आहे. या राज्यात सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्यानुसार काम होईल.’ तसेच काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते, असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- IAS पूजा सिंघल ईडीच्या कचाट्यात; तब्बल १९ कोटींची रक्कम जप्त
- “…हे देखील भोंग्यांवरून जाहीर करा”, जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र
- राज ठाकरेंच्या भूमिकेवर सर्वात जास्त हिंदू समाज नाराज – संजय राऊत
- IPL 2022 GT vs MI : रोहितनं ठोकला डोळ्यांची पारणं फेडणारा षटकार..! रणवीर सिंहही झाला फिदा; पाहा VIDEO!
- “…त्याचे परिणाम देर सवेर असेच येतात”, अतुल भातखळकर यांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला


