Share

“महाडिकांच्या जागी संभाजीराजेंना उमेदवार बनवून का विजयी केले नाही?”, संजय राऊतांचा भाजपला सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भाजपने शिवसेनेला टार्गेट करत टीका करण्यास सुरुवात केली होती. बहुप्रतीक्षित झालेल्या राज्यसभा  निवडणुकीत भाजपने 3 तर महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोक मधून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण भाजपचा विजयोत्सव आणखी काही दिवस सुरू राहील. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी न दिल्याचे फळ त्यांना मिळाले, असे भाजप व श्री. फडणवीस यांच्यातर्फे सांगितले गेले. मग धनंजय महाडिकांच्या जागी भाजपने संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार बनवून राज्यसभेसाठी का विजयी केले नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच सर्वच गोष्टीचे राजकारण व राजकारणाचा व्यापार करायचा हे त्यांचे धोरण, विधान परिषदेची निवडणुकही त्यांनी तागडीवरच ठेवली आहे. केंद्रीय यंत्रणांची लाठी-काठी हातातून दूर केली तर भाजपकडे काय उरते? असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!