Share

Sandipan Bhumare | “वर्षा बंगला सोडताना उद्धव ठाकरेंनी एखाद्या नवरी सारखं…”, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा संदीपान भुमरेंच्या निशाण्यावर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अमरावती येथे एक सभेला औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी संबोधित केलं. या सभेमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाही यावेळी त्यांनी अनेक खुलासे देखील केले आहेत.

एखादी नवरी घर सोडताना कसं सोंग करते तसं उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताना सोंग केलं, असं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जायचो, तेव्हा मास्क लावून असायचे, आता सरकार गेलं आणि मास्कही गेलं, खुर्ची गेली आणि कोरोनाही गेला, ठाकरे हे केवळ टीव्हीवर दिसायचे, टीव्ही बंद केला तर ठाकरेही दिसत नसायचे, असा जोरदार टोला संदीपान भुमरे यांनी लगावला.

आम्ही सगळ्यांनी स्वतः एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार केलं असल्याचं यावेळी भुमरेंनी सांगितलं आहे. आम्हाला गद्दार म्हणायचा यांना अधिकार नसूनजेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हापासून आमचा विरोध होता, पण आमचं ऐकायला कोणीच नव्हतं, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, मी कॅबिनेट मंत्री होतो तरीही मी माझं पद धोक्यात टाकले. कारण आम्हाला शिवसेना वाचवायची होती. बाळासाहेबांचे विचार वाचवायचे होते. खरी गद्दारी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी केली. आम्हाला गद्दार म्हणायचा त्यांना अधिकारच नाही. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच खरे सरकार चालवत होते, असा दावाही संदीपान भुरे यांनी केला.

मबत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!