Share

राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !

Published On: 

पुणे : महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परकीय गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी व स्वराज्याची निर्मितीचे बळ हे याच गडकिल्ल्यांमधून मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य याची मशाल पेटवली. इतकंच नाही तर हिंदवी स्वराज्याची निर्मिती देखील केली.

त्या भव्य ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असलेले गड-किल्ले आजही महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कणखर दगडांच्या आधारावर उभे आहेत. दरम्यान, राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. राजगडाची भव्यता आजही टिकून असून तरुणाईला देखील या गडाचे अप्रूप आहे.

त्या कालच्या ऐतिहासिक वास्तू जरी आज पूर्णपणे गड-किल्ल्यांवर सुस्थितीत नसल्या तरी या किल्ल्यांच्या पोटात मात्र मोठा इतिहास दडला आहे. त्यामुळेच रायगड पाठोपाठ अनेक किल्ल्यांमध्ये तज्ज्ञ मंडळींच्या साहाय्याने उत्खननाचे कार्य हे अनेक शिवप्रेमी संघटनांनी घेतले आहे. राजगड किल्ल्यावर साफ सफाईचे काम सुरू असताना काही ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत.

सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गप्रेमी संस्थेच्या वतीने साफ सफाईचे काम सुरू असतानाजमिनीखाली काही वस्तू सापडल्या आहेत. यात काही पुरातन नाणी, तोफेचे गोळे, तलवारीचे पाते, देवीच्या लहान मुर्ती आणि लोखंडी अडकित्ता आदींचा समावेश आहे. आता या सर्व वस्तू अधिक अभ्यासासाठी पुरातत्व वाभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सापडलेल्या नाण्यांपैकी काही पेशवेकालीन आणि काही ब्रिटिशकालीन असावीत असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!