मुंबई: राज्यात अनेक मोठ्या घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे.
“नवीन सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ११ तारखेनंतर होणार आहे. सरकारच्या स्थिरतेवर भाजपाच्या गोटात शंका दिसत आहे. राज्यात भाजपाच्या सत्तेच्या लालसेपोटी आलेली अस्थिरता, प्रलंबित प्रश्न व नैसर्गिक सावट पाहता मंत्रीमंडळ नसणे हे दुर्दैवी आहे. काही अघटीत घडले तर हे सत्तालोभी जबाबदार असतील.”, असा इशारा सचिन सावंत यांनी ट्वीट करत दिला आहे.
नवीन सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ११ तारखेनंतर होणार आहे. सरकारच्या स्थिरतेवर भाजपाच्या गोटात शंका दिसत आहे. राज्यात भाजपाच्या सत्तेच्या लालसेपोटी आलेली अस्थिरता, प्रलंबित प्रश्न व नैसर्गिक सावट पाहता मंत्रीमंडळ नसणे हे दुर्दैवी आहे. काही अघटीत घडले तर हे सत्तालोभी जबाबदार असतील.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 8, 2022
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे ११ तारखेनंतर मोठ्या घडामोडी होण्याची चिन्हे आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ENG vs IND : नाद नाद नादच..! रोहित शर्मा बनला विश्वविक्रमी कर्णधार; नक्की वाचा!
- ENG vs IND 1st T20I : पहिल्याच चेंडूवर बटलरनं टेकले गुडघे..! भुवनेश्वर कुमारनं केलं क्लीन बोल्ड; पाहा VIDEO
- Sanjay Raut : शिवसेनेच्या नव्या पक्ष चिन्हाबाबत संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
- Ranvir Singh : उर्फी जावेदच्या फॅशन स्टाईलवर रणवीर सिंगने दिले जबरदस्त उत्तर, म्हणाला…
- Pandharpur : वारकऱ्यांसाठी टोलमाफीची फक्त घोषणाच! नाक्यावरील कर्मचारी म्हणतात GR दाखवा


