मुंबई : सध्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण ७’ची जोरदार चर्चा आहे. हा शो लोकप्रिय शो आहे. चाहते या शो’ला भरभरून प्रेम देतात. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी करणचे पहिले गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. रणवीरने त्याचं लग्न, बेडरुम सीक्रेट्स आणि सेक्स लाइफबद्दल या शोमध्ये बरेच खुलासे केले. यावेळी त्याने उर्फी जावेदबद्दल देखील भाष्य केले आहे.
कॉफी विथ कारणमध्ये रणवीरला खूप प्रश्न विचारण्यात आले. यावेळी करणने रणवीरला इतर कलाकारांच्या फॅशन सेन्सबद्दल प्रश्न विचारला. एकदा वापरलेले कपडे पुन्हा न वापरणारा कलाकार कोणता? असा प्रश्न करणने रणवीरला विचारला. त्यावर रणवीरने एकही क्षण न घालवता लगेचच उर्फी जावेदचे नाव घेतले.
https://www.instagram.com/p/CfuEknxFbkv/
दरम्यान, या शोमध्ये रणवीर आणि आलिया या दोघांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आलियाने देखील तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. यावेळी आलियाला लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती म्हणाली, “लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी काहीच करत नाही. कारण लग्नाच्या एवढ्या सगळ्या विधी झाल्यानंतर आपण थकलेले असतो”.
महत्वाच्या बातम्या :


