जयपूर : भारतीय क्रिकेट संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार असून या मालिकेतील पहिला सामना बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेमुळे भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे.
रोहित शर्मा आता पूर्णवेळ कर्णधार म्हणून भारतीय T20 संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा निव्वळ योगायोग आहे की रोहित जयपूरमधून कर्णधारपदावर पदार्पण करत आहे कारण त्याला जयपूरशी विशेष जोड आहे. रोहितने 9 वर्षांपूर्वी जयपूरमधूनच दुसऱ्या संघासाठी कर्णधारपदाची सुरुवात केली होती.
रोहितने 7 नोव्हेंबर 2012 रोजी रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर जयपूरमधून पदार्पण केले. 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा रोहित जयपूरला परतला आहे आणि पुन्हा एकदा तो याच शहरातून कर्णधारपदाची कारकीर्द सुरू करत आहे.
यासोबतच रोहितचे ९ वर्षांपूर्वीचे ट्विटही व्हायरल होत आहे, ज्यात मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्याने तो खूप खूश होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ट्विटमध्ये रोहित म्हणाला होता, ‘मी जयपूरला पोहोचलो आहे आणि हो, मी संघाचे नेतृत्व करेन. या जबाबदारीबद्दल मी खूप उत्सुक आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- काही तरी द्या वाल्या लोकांची वेदना मी समजू शकतो; राऊतांचा फडणवीसांना टोला
- न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात मोठे बदल; ‘या’ खेळाडूंसह ‘हिटमॅन’ उतरणार मैदानात!
- ‘मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी कशी काय मिळते? ते काय कोविड न होणारं जॅकेट घालून येतात का?’
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’


