Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ”या” नेत्याकडे ५ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्यात शिवसेना, भारतीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून ‘महाविकास आघाडी’ सरकार स्थापन झाले. या तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सतत चालूच असते. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष राज्यभर आपला पक्ष कसा वाढवता येईल याचा प्रयत्न करत असतो. आजच राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांना आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील ५ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत १०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवले आहे. भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच महत्वाच्या विधानसभा मतदार सांघाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रोहित पवार यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आपल्या पक्षाने ही महत्वाची जबाबदारी आपल्यावर सोपविल्याची माहिती दिली आहे. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून या पाचही मतदार संघात आपण राष्ट्रवादी पक्ष वाढवणार आहोत असा विश्वास आज रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे, श्रीगोंद्यामध्ये भाजपचे बबनराव पाचपुते, भूम-परांड्यामध्ये शिवसेनेचे तानाजी सावंत, उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे कैलास पाटील आणि करमाळ्यात अपक्ष संजय शिंदे आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला या पाच विधानसभा क्षेत्रात आपला पक्ष वाढविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे एवढं नक्की.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!