Share

चौथे शतक ठोकताच ऋतुराज गायकवाडने केली विराटच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विजय हजारे करंडक (Vijay Hazare Trophy) स्पर्धेच्या पाचव्या एलिट गटात महाराष्ट्राने चंदीगडवर ५ गडी राखून मात केली. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने शानदार 168 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीतील त्याचे हे चौथे शतक आहे. या शतकासह गायकवाडने विराट कोहली, (Virat Kohli) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal ) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

ऋतुराज गायकवाडच्या आधी विराट कोहली, देवदत्त पडिक्कल आणि पृथ्वी शॉ यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका मोसमात चार शतके झळकावली आहेत. देवदत्त पडिक्कलने सलग चार डावात शतक झळकावले.

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत रुतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएलची ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर त्याने आता आपली पातळी आणखी उंचावली आहे. आयपीएल 2021 मध्ये त्याने 16 सामन्यात 635 धावा केल्या. त्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांचाही समावेश आहे.

ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 600 हून अधिक धावा केल्या आहेत.

136(112)-मध्य प्रदेश

154*(143)-छत्तीसगड

124(129)-केरळ

21(18)-उत्तराखंड

168(132)- चंदीगड

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!