🕒 1 min read
मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले. 4 सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 3-1 ने जिंकली. विराट ब्रिगेडला हा फॉर्म इंग्लंडमध्येही सुरू ठेवायचा आहे. आता टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका होणार आहे.
आगामी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला ऋषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या दौऱ्यापूर्वी महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी वर्ल्ड कप विजेते कॅप्टन कपिल देव यांनी ऋषभ पंतला एक मोलाचा सल्ला दिला आहे.’ऋषभ पंतने इंग्लंड दौऱ्यात पंतला आक्रमकतेबरोबरच सावध खेळ खेळण्याची आवश्यकता आहे. त्याने जर तसे केले तर त्याला दीर्घकाळ बॅटींग करता येईल, असा सल्ला कपिल देव यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सामान्य युवकाचा संभाजीराजेंनी केला थाटात वाढदिवस साजरा
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक

