🕒 1 min read
औरंगााबाद : शहरात करोना संसर्ग पसरू नये.यासाठी रिक्षातून फक्त दोन प्रवासी नेण्याची परवानगी आरटीओ विभागाकडून जारी करण्यात आलेली आहे. जयभवानीनगर चौकात गुरुवारी ११ वाजेच्या दरम्यान रिक्षा क्रमांक (एमएच-२०-डीसी-३६४४) मधून तीन प्रवासी घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
रिक्षाचालक विजय वाघ (रा. जयभवानीनगर), अन्वर शहा (रा. गांधीनगर) यांनी त्यांना विचारणा केली. सुरुवातीला त्यांनी अत्यावश्यक कारणांसाठी जात असल्याची बतावणी केली. पोलिसांनी खोल वर जाऊन चौकशी केली असता.
विजय वाघ हा संचारबंदीचे नियम मोडत तीन प्रवासी नेत असल्याचे समोर आले. त्यामुळे वाघ आणि अन्वर शहा यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून विरार घटनेच्या चौकशीचे आदेश
- ‘विरारसारख्या घटना वारंवार घडताहेत, कठोर पावलं उचलणे गरजेचे’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विट
- कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची आज उच्चस्तरीय बैठक
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- ‘हवं तर मी तुमच्या पाया पडतो पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन द्या!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
