Share

‘विरोधकांच्या मनाप्रमाणे निर्बंध शिथिल होणार नाहीत’- अस्लम शेख

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, काही प्रमाणात आणि काही भागात अजूनही निर्बंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याचा या निमित्ताने पर्यटन सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली.

या परिषदेत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. रेस्टाँरंट, मॉल आणि दुकानं यांची वेळ वाढवावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स आणि रेस्टाँरंट मालक संघटनांशी चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ विरोधी पक्षांनी कितीही दबाव टाकला तरी तसं काही त्यांच्या मनाप्रमाणे होणार नाही.

सरकारला बरीच कामे पहावे लागतात. मुंबईची परिस्थिती आधीसारखी होऊ नयेत. टप्याटप्याने सर्व सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विरोधक कितीही दबाव टाकत असले, तरी आम्ही सर्वांचा विचार करत आहोत. गणेशोत्सव येत आहे, त्याबाबतसुद्धा नियमावली तयार होत आहे. मुख्यमंत्री स्वतः या सर्व बाबींवर काम करत आहेत, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!