🕒 1 min read
पुणे: राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या २० हजारांवर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल. असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल(Iqubal chahal) यांनी दिला आहे. त्यातच आता पुण्यातही निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी यासंबंधी तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज साडे चार वाजता होणार आहे. या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण याबाबत चर्चा करून निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळाही पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. तर विद्यापीठाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज १२ वाजता बैठक बोलावली आहे.
दरम्यान, काल(३ जाने.)मुंबईत ८ हजार ८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सोमवारी(२ जाने.) ६२२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची रुग्णसंख्या आता ५७८ वर पोहोचली असून २५९ रुग्ण बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? उदय सामंतांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
- पुणे जिल्हा बँकेची आज मतमोजणी; अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
- अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- ‘…पण अखेर त्याने मला गाठलंच’, पॉझिटिव्ह आल्यानंतर रोहित पवार यांची भावनिक पोस्ट

