Share

केंद्र सरकारमुळे आरक्षण तर धोक्यात आलेच, पण…- जितेंद्र आव्हाड

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी आता चार आठवड्यांची वेळ दिली आहे. केंद्राने इंपिरिकल डाटा दिला असता तर सर्वच प्रश्न मार्गी लागू शकले असते. ओबीसी आरक्षण प्रश्नी न्यायालयाच्या सुनावणीवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याबाबत आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंपिरिकल डाटावरुन केंद्राला धारेवर धरले आहे.

केंद्र सरकारने ओबीसी तसेच इतर समाजाच्या उन्नतीसाठी असणाऱ्या आरक्षणासाठीचा आवश्यक असलेला इम्पेरिकल डाटा अर्थात माहिती पुरविण्यास नकार दिला आहे… केंद्राच्या या कृतीमुळे आरक्षण तर धोक्यात आलेलेच आहे परंतु यामुळे समाजातील मुलांचे शिक्षण, नोकऱ्या तसेच राजकीय नुकसानीला जबाबदार कोण?, असा गंभीर सवाल केंद्राला केला आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले आहे. केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी असल्याचे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!