🕒 1 min read
नवी दिल्ली : यंदा केंद्राचे पावसाळी अधिवेशन हे वादळी ठरलं आहे. पेगासस प्रकरण, शेतकरी आंदोलन, आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारची कोंडी केली होती. विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाजाचे बहुतांश दिवस हे वाया गेल्यानंतर १०२ व्या घटना दुरुस्तीनिमित्त विरोधकांनी एक पाऊल मागे घेत संसदेत उपस्थिती लावली. काल लोकसभेत १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. दोनतृतीयांश मतांनी घटना दुरुस्ती मान्य झाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे.
यावर चर्चा करताना शिवसेना खासदार संजय राऊत हे चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळालं. तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे,’ अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
‘छत्रपती आरक्षणासाठी आंदोलनात उतरले, हे कधी बघितलंय का ?
‘मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलने केली, मोर्चे काढले. हे सर्व मोर्चे शांततेत झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे स्वतः ५० टक्क्यांची अट काढून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलनात उतरले. आजही ते मराठा समाजासाठी आंदोलन, मोर्चे करत आहेत. छत्रपती आरक्षणासाठी आंदोलनात उतरले, हे या आधी कधी बघितलंय का ?’ असा सवाल करत संजय राऊत यांनी संभाजीराजे यांची पाठ थोपटली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आजारी माणसाला गोळी दिली पण अर्धीच, तो बरा कसा होणार?’ ; शिवसेनेचा सवाल
- पुराशी सामना केल्यानंतर आता डेल्टा प्लसने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली
- भाजपमध्ये साईडलाईन झालेले विखे, हर्षवर्धन पाटील यांनी ‘या’ कारणासाठी घेतली अमित शाहांची भेट
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘चूकीचा उत्सव आणि चूक सुधारण्याचा इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून’, संजय राऊतांचा केंद्राला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
