सिल्लोड : राज्य सरकारच्या पिकेल ते विकेल अभियानांतर्गत बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव व ग्राहकांना ताजी फळे भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावे तसेच शेतकऱ्यांच्या बरोबर ग्राहकांना देखील याचा लाभ होईल या अनुषंगाने विक्री धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचा आव्हाना येथे बुधवारी दि.३ प्रारंभ झाला.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व संलग्न विभागाच्या तसेच सहकार पणन नाबार्ड पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची सांगड घालण्यात येईल विविध योजना अंतर्गत शेतकरी गटांना उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी तयार केलेला शेतमाल थेट विक्री करता पोहोचून दिलासादायक काम केले जाईल नवीन पिढी शेतामध्ये विविध प्रयोग करत आहेत.
त्यांच्या मालाला चांगला भाव भेटावा व बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने सदर अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी सभापती विनोद गावंडे, माजी सभापती भानुदास सरोदे, योगेश गावंडे, मंडळ कृषी अधिकारी बी.जी.सुरडकर, कृषी पर्यवेक्षक व्ही.पी.भोसले, कृषी सहाय्यक एन.एन.गावंडे तसेच शेतमाल उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- महाविद्यालय प्रशासनाच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
- ‘चायना आणि पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही इतका शेतकऱ्यांसाठी केलाय’
- गेल्या वर्षभरात खडसे,सरनाईक यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांना आल्या आहेत ईडीच्या नोटीसेस
- यामुळे झाले ह्युन्दाईच्या क्रेटाचे डीझेल मॉडेल बंद !
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
