जालना : राज्य सरकारने पाच वर्षाच्या कार्यकाळात उत्तम कामगिरी केली आहे. हा संदेश लोकापर्यंत पोहचविण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचे राज्यात उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. जनादेश यात्रा उद्या सांयकाळी जालना शहरात पोहचणार आहे. डॅा.फ्रेझर हायस्कुल येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदप्रसाद नड्डा यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसह अन्य विविध प्रश्नावर दानवे यांनी मंगळवारी (ता.27) जालन्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
दानवे यांनी भाजप -शिवसेना युतीबाबत दररोज होत असलेल्या चर्चेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा फार्मुला अगोदरच ठरला आहे. योग्य वेळी तो जाहीर केला जाईल. या घडीला भाजपात प्रवेश करण्यासाठी राज्यभरात 17 बडे नेते रांगेत असल्याचा गैाप्यस्फोट करीत दोन्ही पक्ष निवडणुक एकत्रच लढणार असल्याचा पुनरूच्चार दानवे यांनी केला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी 76 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत विचारलल्या एका प्रश्नाच्या अनुषंगाने दानवे म्हणाले की, या प्रकरणी भाजपने सूडबुध्दीने गुन्हे दाखल करण्यास सांगितले नाही, तर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार अब्दुल सत्तार हे माझे राजकीय नव्हे तर वैयक्तिक मित्र असल्याचेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात
सत्ता असताना काही केलं नाही, आता कसल्या यात्रा काढता ?


