Share

“राऊतांनी उद्धव ठाकरेंचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली”, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान

Published On: 

पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे. (Chandrakant Patil sensational statement) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजकारण गढूळ झालय असं वाटत असेल आणि ते सुडाचे राजकारण करत नसतील तर त्यांनी सर्वांत अगोदर संजय राऊतांना शांत करावे, मग सर्व काही ठिक होईल. संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली आहे असा माझा अंदाज आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरेंनी आता राऊतांचे बटन ऑफ करून त्यांना शांत करावं. आपोआप सगळं शांत होईल. दरम्यान पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण आणि अपंगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच येरवडा येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे युवक संघटना आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी आठवले यांनी शिवसेना-भाजपने एकात यावे असे म्हंटले होते. यावरच चंद्रकांत पाटील म्हणाले की, “भाजप-सेनेने एकत्र यावे ही रामदास आठवले यांची मनापासून इच्छा दिसून येत आहे. पण आपण जी इच्छा व्यक्त करतो तसं होतच असं नाही. जरी छगन भुजबळ मला भविष्य सांगणारे जोशीबुवा असं म्हणाले असले तरी मी भविष्य सांगणारा जोशीबुवा नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप-सेना एकत्र येतील की नाही ते मला माहिती नाही.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!