नवी दिल्ली : मुलींवर संस्कार नसल्यानं बलात्काराच्या घटनांत वाढ होत आहे, असं बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशातील बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी यांनी केलं आहे.
“आपल्या तरुणी मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत,”असंही त्यांनी म्हटलं आहे.
“आपल्या तरुण मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचा धर्म आहे. माझा धर्म आहे, सरकारचा धर्म आहे. परंतु, कुटुंबाचाही हा धर्म आहे. जिथे सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथं मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरं कुणीही समोर येणार नाही” असंही त्यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :-
- देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याच्या कामी अटल बोगदा महत्त्वाची भूमिका बजावणार- मोदी
- शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल – दरेकर
- मोठी बातमी : कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान
- योगीजींच्या राज्यात महिला पोलीस नाही का? – संजय राऊत यांचा सवाल
- मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही – पीयूष गोयल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

