सिंधुदुर्ग : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझे यांना एनआयए कोर्टाने २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सुरुवातीपासूनच भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर रविवारी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महाराष्ट्रात त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.
‘महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे,’ असं भाजप नेते नारायण राणे यांनी सांगितलं आहे.
‘नारायण राणेंच्या या मागणीची खासदार विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. ‘नारायण राणेंना काही कामधंदा उरलेला नाही. भाजपने सुद्धा त्यांना अडगळीत फेकून दिले आहे. अमित शहा यांनीही त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यांचं पत्रं केऱ्याच्या टोपलीत फेकून दिलं आहे,’ अशी बोचरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा; पटोलेंची आक्रमक भूमिका
- लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले, सरकारने त्यावर मीठ चोळले!
- ‘मुकेश अंबानींनी लाखो लोकांना रोजगार दिलाय; एनआयएची कारवाई योग्यच !’
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ! एनसीबीची सुप्रिम कोर्टात याचिका; १८ मार्चला सुनावणी


