Share

Ramdas Athvale | “वेदान्त-फॉक्सकॉन गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसून येतं आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षनेत्यांवर तर सत्ताधारी पक्षनेते विरोधी पक्षनेत्यांवर आरोप, टीकेबाजी करत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या वादामध्ये उडी घेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रामदास आठवले ?

महाविकास आघाडीमुळे वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. वेदांत-फॉक्सकॉन हा खासगी प्रकल्प आहे. महाविकासआघाडी सरकारने त्या कंपनीच्या मालकाशी बोलायला हवं होतं. त्यांना ज्या सुविधा पाहिजे होत्या, त्या सुविधा पुरण्याचं आश्वासन देणं आवश्यक होतं. परंतु महाविकास आघाडी सरकारने ते न दिल्याने तो प्रकल्प गुजरातला गेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, वेदांताचा प्रकल्प जरी गुजरातला गेला असला, तरी उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात क्रमांक एकचं राज्य आहे आणि कायम राहील, असा दावा देखील रामदास आठवले यांनी याठिकाणी केला असल्याचं समजतं आहे.

पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, आणखी मोठे उद्योग आम्ही राज्यात आणणार आहोत. हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. आमचं शिंदे-फडणवीस यांचं सरकार तर आता आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडी सरकारलाच या प्रकल्प राज्यात ठेवता आला नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!