मुंबई – हात धुवुन मागे लागेल अशी जाहीर धमकी विरोधी पक्षांना देणे ही मुख्यमंत्र्यांची संविधानिक दृष्ट्या चूक आणि लोकशाहीला मारक भूमिका आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी सरकार ने वर्षभर केलेले कामाची आधारावर राज्य सरकारला किती गुणा द्यावेत याचा जनतेला प्रश्न केला तर जनता महाविकास आघाडी सरकार ला नापास सरकार अशी संभावना करीत 100 पैकी 30 गुण देईल असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
कोरोना च्या संकटात राज्य सरकार ने निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई; विजबिल माफीवरून जनतेच्या डोळ्यांत राज्य सरकार ने केलेली धूळफेक आणि कंगना राणावत; अर्णब गोस्वामी प्रकरणी राज्य सरकार ची दिसलेली सुडबुद्धि हे राज्य सरकार ला शोभणारे नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धुवून विरोधकांच्या मागे लागणार अशी धमकी देणे हे संविधानिक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीला शोभणारे नाही; लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो; प्रश्न विचारणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे असते. हात धुवुन मागे लागायचे नसते. विरोधकांच्या मागे हात धुवून लागणार ही धमकी संविधानिक दृष्ट्या चूक,लोकशाहीला मारक भूमिका आहे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !
- सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला : चंद्रकांत पाटील
- ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे
- ‘ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा!; दिल्लीमधील शेतकरी आंदोलनावरुन शिवसेनेचा भाजपला टोला

