Share

कांजूरमार्गच्या जागेसाठी राज्य सरकारने आक्रस्ताळेपणा करू नये – रामदास आठवले

Published On: 

मुंबई : मेट्रो करशेडसाठी कांजूर मार्गच्या जागेसाठी राज्य सरकारने जास्त आक्रस्ताळेपणा करू नये. संबंधित जागा केंद्र सरकारची असल्याचे उच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागे साठी केंद्र सरकारशी चर्चा करावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

कांजूरमार्गची जागा राज्याची असल्याचा कांगावा राज्य सरकारने केला. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने कांजूरमार्गची जागा केंद्र सरकार ची असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे राज्य सरकार ने केंद्र सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा. जोपर्यंत केंद्र सरकार परवानगी देणार नाही तोपर्यंत कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रोचे कारशेड राज्य सरकारला उभारता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारशी बोलून मार्ग काढावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

दरम्यान, रेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे. मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!