Share

आमचा हनुमान सत्तेच्या लंकेतच रमला – राजू शेट्टी

Published On: 

🕒 1 min read

सांगली : शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या हनुमानाला भारतीय जनता पक्षाच्या लंकेत पाठविले होते. परंतु आमचा हनुमान सीतेला मुक्त करण्याऐवजी लंकेतील सत्तेतच रममाण झाला, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.त्यामुळे आगामी काळात शेट्टी विरुद्ध खोत असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत .

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकेकाळचे सहकारी. स्वाभिमानी उभा करण्यात तसा या दोघांचा महत्वाचा वाट होता . मात्र दोघांमध्ये मतभेद वाढत गेल्याने मैत्री संपली आणि आता एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनत चालले आहेत . शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या प्रश्नांसाठी यापुढे लढत राहणार असे सांगत शेट्टी नुकतेच NDA तून बाहेर पडले . खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली यात शेलक्या भाषेत खोत यांच्यावर टीका केली.
काय म्हणाले शेट्टी ?
आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आपल्याविरोधात कोणालाही उभे करा. त्याला धडा शिकविण्याची हिंमत आपल्यात आहे सांगली जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपबरोबरीनेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपण चांगली अद्दल घडवली आहे.शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या हनुमानाला भारतीय जनता पक्षाच्या लंकेत पाठविले होते. परंतु आमचा हनुमान सीतेला मुक्त करण्याऐवजी लंकेतील सत्तेतच रममाण झाला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!