कोल्हापूर : नव्या कृषी कायद्यांविरोधात सहा दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकराने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे. तर, नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मागण्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अस देखील शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
आता दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’ने राज्यभर आंदोलन केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं या आंदोलनात त्यांनी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं तर आंदोलनादरम्यान धक्काबुक्की देखील झाली.
दरम्यान, यावेळी राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे असून कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही. येत्या 2 दिवसांत जर सरकारने तोडगा काढला नाही तर एकही केंद्रीय मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, त्याची कॉलर पकडून जाब विचारू. असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणरे अमित शहा कोण आहेत? असा सवाल करत आमचं संपूर्ण आयुष्य लढण्यात गेलं आता संपूर्ण देश पेटविल्याशिवाय राहणार नाही असा एल्गार देखील शेट्टी यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही : पाटील
- सावरपाडा एक्सप्रेस, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतची नोकरीसाठी राज्यपालांकडे धाव…
- धावत्या कारमध्ये थरार; मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस आमदारावर प्राणघातक हल्ला !
- ऑनलाइन खरेदीवर मिळणाऱ्या ‘कॅश बॅक’विरोधी अ. भा. व्यापारी महासंघाची तक्रार…
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

