मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी तसेच मविआ सरकारवरही निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपकडून खुलेपणाने समर्थन देण्यात आले. दरम्यान या पार्श्वभूमीवरच काल (२९ एप्रिल) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मस्जिद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल करत भाजपवरही निशाणा साधला. यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“बाबरी मस्जिद पाडताना राज ठाकरे कुठे होते माहीत नाही. पण उद्धव ठाकरे नक्कीच त्यांचा कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते.”, असा खोचक टोला नितेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.
बाबरी मस्जिद पाडताना राज ठाकरे कुठे होते माहीत नाही..
पण उद्धव ठाकरे नक्कीच त्यांचा कॅमेरा साफ करत मातोश्रीत बसले होते!!
— Nitesh Rane (@NiteshNRane) April 29, 2022
दरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजपवर तुटून पडा असे आदेश कालच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिले आहेत. तर राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम ठाकरे सरकारला दिला आहे. त्यात उद्या १ मे रोजी त्यांची औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामूळेच…”, अविनाश जाधवांची मविआ सरकारवर टीका
- ‘मनसे’ नेत्याला कल्याण पोलिसांची नोटीस; संदीप देशपांडेंनी म्हटले, “‘शिव’ की ‘सेना’ कहलाने वाला…”
- “…याची जाणीव केंद्राला असायला हवी होती”, संजय राऊत यांचे टीकास्त्र
- Aurangabad MNS Sabha : राज ठाकरेंना खासदार इम्तिजाय जलील यांनी दिले इफ्तार पार्टीचे आमंत्रण; म्हणाले, “जे राजकारणासाठी…”
- “…हा सगळा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असाच आहे”, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला टोला


