मुंबई: मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास महादेव भोईर यांना कल्याण, खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी नोटीस बजावली आहे. आपले कार्यकर्ते अप्रत्यक्ष विना परवाना एकत्र जमवून कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये, अन्यथा कारवाईचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे. यावरच मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे.
“रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आएगा, ‘शिव’ की ‘सेना’ कहलाने वाला हनुमान चालिसा से डर जाएगा..!!”, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. राज्यात सध्या हनुमान चालीसा प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यात उद्या १ मे मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादेत जाहीर सभा घेणार आहेत. याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आएगा,
'शिव' की 'सेना' कहलाने वाला हनुमान चालिसा से डर जाएगा..!! pic.twitter.com/Ybt27AcCC4— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 30, 2022
नेमके पत्रात काय म्हटले आहे?
मी सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक प्रशासन, खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण आम्हास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून फौजदारी दंड प्रक्रिया सहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस देण्यात येते की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानच्या वेळी मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दिनांक ३ मे नंतर मशिदी वरील भोगे काढून टाकणे बाबत चेतावणी दिली आहे. तरी आपणांस याद्वारे सुचीत करण्यात येते की, आपन अथवा आपले कार्यकर्ते / समर्थक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विना परवाना एकत्र जमवुन गर्दा होईल असे कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करू नये ज्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनीक शांतता भंग होईल.
आपणास सदरची नोटीस देऊनही आपण कार्यकर्ते जमवून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य केल्यास आपल्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…याची जाणीव केंद्राला असायला हवी होती”, संजय राऊत यांचे टीकास्त्र
- Aurangabad MNS Sabha : राज ठाकरेंना खासदार इम्तिजाय जलील यांनी दिले इफ्तार पार्टीचे आमंत्रण; म्हणाले, “जे राजकारणासाठी…”
- “…हा सगळा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असाच आहे”, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला टोला
- बंधूचे कौतुक करायचे नाही, असे राज ठाकरेंनी ठरवले असेल; जयंत पाटलांचा टोला
- “महाजेनकोचं नियोजन नीट नसल्यामुळे वीजटंचाई”- रावसाहेब दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

